Posts

Showing posts from April, 2018

प्राणी व वन संवर्धन काळाची गरज

Image
प्राणी व वनस्पती संवर्धन काळाची गरज वन्यजीवांचे संरक्षण काळाची गरज       वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. त्यादृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक ए.के.मिश्रा यांच्याशी महान्यूजने वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर केलेली ही बातचीत   जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्य...